बाबासाहेब कदम
मुंबई ता.04 मुळवेतनात साडेसहा हजाराची वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेतल्याने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे..
मूळ पगारात साडेसहा हजाराची वाढ करण्याचे आश्वासन देत सरकारने आमची विनंती मान्य केली आहे संघटनेसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झालेले संप मागे घेण्यात येत आहेत असे संघटनेच्या वतीने कळवले आहे.राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळी आपल्या आपल्या कामावर रुजू व्हावे असे संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या इतकी वेतनश्रेणी एसटी कर्मचाऱ्यांना द्यावी ही मागणी सरकारसाठी महत्त्वाची बाब होती.राज्यातील विधानसभा निवडणुका पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून गणेशोत्सव पुढच्या काही दिवसांत आलाय.आजच्या निर्णयाच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी व परिवहन खाताने एसटी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पगार वाढ दिली आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार आहे…
संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना हया संपामध्ये सहभागी झालेल्या होत्या त्या संघटनांमद्ये समाधान झालेला दिसतोय कारण त्यांनी या निर्णयाचे स्वागत केलेला आहे .महाराष्ट्र एसटी वर्कर काँग्रेसची संघटना आहे ती या संपात सहभागी झाले