ताज्या घडामोडी

७५ टक्के पेक्षा जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार गौरव : संदीप दळवी गटविकास अधिकारी

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता. १९ लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून आल्याने मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबविले आहे.सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती असे आवाहन नांदगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी संदिप दळवी यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा प्रत्येक मतदारांने वापर करणे आवश्यक आहे.देशाची लोकशाही बळकट व्हावी व योग्य उमेदवारांची निवड व्हावी. यासाठी सर्वांना मतदान करणे अपेक्षित आहे.भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे.उज्वल भारताची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी व आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा,आपल्या कुटूंबातील सर्व मतदारांनी सोमवारी (ता २०) मे रोजी सकाळी ७.३० वा. ते ५.३० वा. या वेळेत आपले आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र घेवून आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहुन मतदान करावे व राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे. सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे.

*******

लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे.७५ टक्के पेक्षा जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतीचा” सुजान – मतदार समृद्ध लोकशाही गौरव ” ने सन्मान केला जाणार आहे.

– संदीप दळवी, गटविकास अधिकारी नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.