नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान बळीराजा आर्थिक संकटात
नांदगांव तालुक्यात विज पडून म्हैस ठार
गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज : वृत्तसेवा
बाबासाहेब कदम
नाशिक ता.०६ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा हवालदिल झालेले आहे
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सोमवार ता.०५ च्या रात्री पासून विजेच्या कडकडाटत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे.या अवकाळी पावसाने उन्हाळी कांदा व काढलेला पोळ कांदा,द्राक्ष, गहू या रब्बी पिकांचें मोठे नुकसान झाल्याने या आसमानी संकटामुळे शेतकरी राजा परत एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे,सध्या एकतर कांदा ला भाव नाही मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हाता तोंडांशी आलेला घास हिरावून नेला जात आहे.
जिल्ह्यात रविवार व सोमवारी दिवसभर सूर्य लपलेला होता. .सोमवार च्या मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला.नांदगाव तालुक्यात साकोरा येथे विज पडून म्हैस ठार झाली आहे.निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे तर दुसरीकडे या पावसामुळे खुडे सुरू असलेल्या द्राक्षबागांचे खुडे बंद करण्याची नामुष्की ओढावलेली आहे.तर उन्हाळी कांदा व शेतात काढून पोळ मारून ठेवलेला लाल कांदा भिजला आहे.काल रविवार (दि.५)पासून मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग व्यथित झाला आहे.एकेकीकडे कांद्याला भाव नाही तर टोमॅटोची वाताहत झाली आहे.दिवसागणिक द्राक्षाचे दर घसरणारे आणि भाव आणि त्यात अवकाळी पावसाने अशातच लावलेली हजेरी यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.या अस्मानी संकटापुढे अगोदरच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अवकाळी पडलेल्या पावसामुळे हतबल व अस्वस्थ झाला आहे.