ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने केली बळीराजाची अवकळा…

साकोरा येथे विज पडून म्हैस ठार

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
भगवान हिरे

नांदगाव /साकोरा ता. ६ नांदगाव तालुक्यात रविवारी ता.०५ रोजी रात्री ढगांचा गडगडाट विजानचा कडकडाटासह अवकळी पावसाने रब्बी पिकाची मोठी हानी केली आहे. तालुक्यातील साकोरा येथील दादा त्रंबक बोरसे यांच्या गट नंबर ११ मधील ऐशी हजार रूपये किमतीची दूध देणारी म्हैस वीज पडून मृत्यू पावली आहे. मयत म्हशीचा पंचनामा तलाठी तुषार येवले व सहाय्यक अनिल हिरे यांनी केला आहे.
रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात गहू आडवा पडलेला आहे.हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.उन्हाळ कांद्याची पात वातावरणामुळे पिवळी पडत आहे तसेच कांद्याचे डोंगळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस पिकलेल्या मालाला बाजारात भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. तसेच जनावरांसाठी लागणारा चारा याचे पण नुकसान झाले आहे. शेतकरी लाखो रुपये खर्च करून पीक उभे करत असतो पीक बाजारात जाऊन हमखास पैसे मिळतील याची शाश्वती शेतकऱ्याला राहिलेली नाही.कधी वातावरणात बदल तर कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी शेती माल पिकवून बाजारात भाव नसल्यामुळे फेकून द्यायची किंवा ट्रॅक्टरने रोटर मारायची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. लाखो रुपये खर्च करून खर्चही निघत नसल्याने कृषीप्रधान देशात “नको रे बाबा ही शेती ” असे शेतकरी म्हणू लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.