नांदगाव ला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी आमरण उपोषण सुरू
काही गावात राजकीय नेत्याना बंदी
गर्जा महाराष्ट्र न्युज वृत्तसेवा
नांदगाव ता .२५ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ४० दिवसांची मुदत घेऊनही प्रत्यक्षात आरक्षणाचा निर्णय न घेतल्यामुळे राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले आहे.सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नांदगाव येथे जुन्या तहसील कार्यालयाच्या गेटवर रविवारी (ता.२३)पासून आरक्षणासाठी साखळी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ‘मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच सकल मराठा समाजाचा मेळावा घेऊन त्यामध्ये २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळावे,असे आवाहन शासनाला केले होते.२४ तारखेपर्यंत जर आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मात्र समाज वेगळी भूमिका घेईल,असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये शासनाला सांगितले होते.मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने मुदत घेऊनही ठोस असा निर्णय न घेतल्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरावली-सराटी गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी नांदगाव येथे जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ सकल मराठा समाजाने साखळ उपोषण सुरू केले.या साखळी आमरण उपोषणाला बुधवारी चंद्रशेखर कवडे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश बोरसे,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संतोष गुप्ता,नांदगाव सुतार समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कदम,अशोक निकम,सूरज पवार यांनी उपोषण स्थळी जात पाठींबा दर्शविला आहे तसेच नांदगाव तालुका सुतार समाज संघटना,नांदगाव तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना आयटक संलग्न या सह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना,संस्था व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपला पाठींबा दर्शविला असून या आंदोलनाला तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे तसेच तालुक्यातील काही गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी केल्याचे माहिती मिळत आहे…