अखेर आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे बाणगाव,भार्डी,न्यायडोंगरी मंडळे दुष्काळी जाहीर :- जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे
गर्जा महाराष्ट्र24 न्युजवृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक ता .२० नांदगाव तालुक्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती असलेल्या बाणगाव,न्यायडोंगरी,भार्डी या तीन महसूल मंडळाचा आमदर सुहास आण्णा कांदे यांच्या सातत्याच्या पाठ पुरव्यास यश येऊन अखेर ही तीन महसूल मंडळाचा दुष्काळी मंडळाच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
२०२३ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्य सरकारने दुष्काळी मंडळाच्या यादीत तालुक्यातील ५ महसूल मंडळाचा समावेश केला.पण २०१७ मध्ये तालुक्यात ५ मंडळाचे विभाजन होऊन ८ महसूल मंडळे झाली प्रशासनाच्या चुकीमुळे या नव्या मंडळाची यादी शासन स्तरावर पोचली नाही यामुळे तालुक्यातील फक्त ५ महसूल मंडळे जाहीर झाली,प्रशासनाच्या चुकीमुळे ही वाढीव ३ मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट झाली नाही या वंचीत मंडळाचा दुष्काळी यादीत समाविष्ट होण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी ऑनलाईन मिटिंग घेत व प्रत्यक्ष जाऊन या मंडळातील परिस्थिती अवगत करून ही मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली,तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी केली आमदर सुहास आण्णा कांदे यांनी विधानसभेत दुष्काळी परिस्थितीवर आवाज उठवत ६ मिनिटे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर संपूर्ण भाषण केले ही तीन मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट न झाल्यास सरकारच्या विरोधात न्यायालयात जाईल असे ठणकावून सांगितले आमदर सुहास आण्णा कांदे हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने सरकारने त्यांची मागणी अखेर पूर्ण करीत बाणगाव,न्यायडोंगरी,भार्डी या तीन मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट केले हे आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या प्रयत्नांचे हे यश म्हणावे लागेल.असे जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांनी गर्जा महाराष्ट्र 24 न्युज शी बोलताना सांगितले