दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेली आणेवारी कमी करावी;माजी आमदार अँड अनिल आहेरांची मागणी
अन्यथा काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता १० तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काढलेली प्राथमिक पैसे नजर आणेवारी त्या त्या गावाच्या ग्राम समितीला विश्वासात घेऊन काढली नसल्याने वस्तुस्थितीदर्शक आणेवारी जाहीर करण्याची मागणी माजी आमदार अँड अनिलदादा आहेर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
माजी आमदार अँड अनिलदादा आहेर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व तालुक्यातील शेतकऱ्यांचे एका शिष्टमंडळाने प्रशासन उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांची भेट घेत त्यांच्याकडे याबाबत निवेदन त्यांना देत सध्याच्या दुष्काळाच्या स्थितीकडे त्यांचे लक्ष वेधताना दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुकाबला करताना तालुक्यातील यंत्रणा गांभीर्याने बघत नसल्याच्या प्रकाराकडे त्यांनी श्री भीमराज दराडे यांचे लक्ष वेधले निवेदनात नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक नजर आणेवारी कडे लक्ष वेधताना सदरची आणेवारी ही कमी करण्यात यावी. तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे तसेच गुरांना चारा नाही. शेतकऱ्यांना कुठलेही उत्पन्न नाही त्यामुळे पिक कर्ज माफी, विज बिल, 100 टक्के माफ व्हावे. तसेच तत्काळ पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या तालुक्यात सुरू करण्यात याव्या, पाणी टँकर सुरू करण्यात यावे, पिक विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. मागील वर्षाचे मार्च व एप्रिल महिन्यात गारपीटीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे. या मुद्दे उपस्थितीत करून प्रशासनाने लक्ष दिले नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा या निवेदनात देण्यात आला या शिष्टमंडळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे,मनमाड बाजार समितीचे संचालक डॉ.पुंजाराम आहेर,रामदास पाटील कैलास गायकवाड,उदय पाटील,धनजय काळे,अरुण निकम,विनोद पवार,नवनाथ बोरसे,निरंजन आहेर,सागर साळुंके,पुंडलिक सदगिर आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
नाशिक:- नांदगाव तालुक्यातील जाहीर झालेल्या नजर आणेवारी कमी करून टंचाईसदृश्य उपयोजनाबाबत प्रशासन उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना निवेदन देताना माजी आमदार अँड अनिलदादा आहेर,कैलास गायकवाड हरेश्वर सुर्वे,रामदास पाटील,उदय पाटील निरंजन आहेर आदी