नांदगाव चा दुष्काळी तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी बेमुद उपोषण सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांचे बेमुद उपोषण,समाधान। न झाल्याने उपोषण कायम सुरू
नांदगाव,ता २ नांदगाव तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेती पिके वाया गेली आहे यामुळे बळीराजा उध्दव झाला असताना राज्य सरकारने ४० तालुके दुष्काळी घोषित केले यात नांदगांव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश नसल्याच्या मुद्द्यावर गुरुवारी ता.०२ पासून येथील नव्या तहसीलपुढे राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे व सहका-यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे
ट्रिगर १ व २ मधील पात्र अपात्र गावांची यादी प्रशासनाने द्यावी यादीत समावेशासाठी प्रशासन नेमके कुठे कमी पडले यासह दहा मुद्द्यांवर यंत्रणाप्रमुख म्हणून तहसीलदारांनी स्पष्टीकरण द्यावे यावर खुलासा जोवर केला जाणार नाही तोवर बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही आज या बेमुदत उपोषणाचा पहिला दिवस होता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जाहीर झाली म्हणजे तालुका सरसकट दुष्काळी जाहीर होईल हा यंत्रणेचा भ्रम यंत्रणेला गाफील ठेऊन गेला,याउलट या प्रश्नाला गांभीर्याने घेतले असते तर कदाचित दुष्काळग्रस्तांच्या यादीत नांदगावचा समावेश होऊ शकला असता असा युक्तिवाद करतांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे हे उपस्थितीत करण्यात आलेल्या मुद्द्यांवर ठाम राहिल्याने आज पासून सुरु करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणावर आज कुठलाही तोडगा दृष्टीक्षेपात आला नाही
तहसीलदार सिद्धार्थ मोरे,गटविकास अधिकारी गणेश चौधरी,तालुका कृषी अधिकारी आर.जी.डमाले यांनी उपोषणस्थळी जाऊन महेंद्र बोरसे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र उपोषण सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळासंबंधी उपस्थितीत केलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यावे अशी अपेक्षा महेंद्र बोरसे यांनी व्यक्त केली
त्या आधारावर प्रशासनाने दुष्काळासाठी केलेल्या कार्यालयीन दस्तऐवजच्या प्रती उपोषणकर्ते महेंद्र बोरसे यांना दिल्यात मात्र पाऊण तासाहून अधिक वेळ झालेल्या या चर्चेत यंत्रणेच्या वतीने उपोषणार्थीना सादर करण्यात आलेल्या उत्तरात ठोस असे काहीच दिसून आले नसल्याने जोवर समाधानकारक उत्तरे मिळत नाही तोवर बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) च्या वतीने करण्यात आल्याने हे उपोषण उद्याही सुरूच राहणार आहे या उपोषणात मछिंद्र वाघ,निलेश चव्हाण सखाराम भुसनर अण्णा काकळीज,दिनकर पाटील,मिलिंद पवार कुणाल बोरसे हे सहभागी झाले आहेत