ताज्या घडामोडी

५० वर्षात पहिल्यांदा आले पाटाला पाणी : ऐन दुष्काळात बळीराजाला मिळाला दिलासा..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते जलपूजन,

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

मालेगांव ता.२६ नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा यश मिळवत गिरणा धरणावरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवत मंगळवारी पाटाला पाणी सोडण्यात आले.

मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते.मात्र यावर्षी सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सध्यस्थीतत गिरणा धरणात पाणीसाठा कमी आहे. या मुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते.आमदार सुहासआण्णा कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून या भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. यावर जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला २९ नोव्हेंबरमध्ये पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी ता २६ रोजी सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले, या मुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या पाण्याचा कळवाडीसह चिंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकुर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका झाली आहे

ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .मंगळवारी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. याप्रसंगी पाट पाणी लाभ क्षेत्रांतील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कळवाडी सह इतर गावातील जनतेकडून आमदार सुहास आण्णा कांदे यांचा कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलतांना आमदार सुहासआण्णा कांदे सांगितले की शेतकरी बांधवांमुळे आज मी आमदार आहे म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते.पाट चारी पाण्यासाठी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठपुराव्या यश मिळवून ऐन दुष्काळी परिस्थितीत आज आपल्या पाटाला पाणी आल्याचा आनंद मला होत आहे,. लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले. तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे,शेरूळ, हिसवाळ या गावांना लिफ्ट द्वारे पाणी मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचे तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी मिळेल असे काम करायचे आहे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान,ज्ञानेश्वरभाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले,यशवंत देसले,प्रदीप सर देसले,रोहित जाधव, बाळू शेठ बोरा,सोनू पाटील,महेंद्र सिसोदे,उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर,चंद्रशेखर शेलार,केदा भवर,नाना पगार,प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी,प्रवीण सावकार,बाबाजी सूर्यवंशी,यशवंत भीमराव देसले,जगदीश देसले,अनिल देसले,गंभीर देसले,हेमंत देसले,प्रदीप देसले,राकेश आहिरे,साहेबराव नरवडे,अभिमान डांबरे,पी.डी चव्हाण,राजू आहिरे,राहुल सरावत,महेंद्र परदेशी,किशोर बोराळे,विलास परदेशी,महेश शेरेकर,सुरेश अहिरे,मिनराम शांताराम मगर,दिलीप मगर,आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.